Homeन्यूज अँड व्ह्यूजजरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही...

जरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही आमचा पाठिंबा

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे अशी हाके यांची मागणी आहे. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. मराठवाड्यात सरकारी धोरणांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद विकोपाला गेला. दुहीचे राजकारण करणाऱ्या सरकारने यावर तोडगा काढावा. दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही आमची मागणी आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यभरात बुधवारपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. १७ हजार  जागांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. ही पोलीस भरती अनेक वर्षांनी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. मात्र एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने उमेदवार कसे उपस्थित राहतील,  याचे सरकारला भान असले पाहिजे .काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे तर काही ठिकाणी पाऊस आहे. याचा फटका पोलीस भरतीतील उमेदवारांना बसू नये. याची खबरदारी सरकारने घ्यावी. भरतीप्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, असेही ते म्हणाले.

 दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून २५  लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत असतात. यावेळी पहिल्यांदा देशातील ६७ विद्यार्थी ७२०पैकी ७२० गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल १० लाख रुपयांची बोली लागली होती. गुजरातप्रमाणे हरियाणा आणि बिहारमधील घोटाळ्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content