Homeचिट चॅटलोकसंख्या दिनानिमित्त आज...

लोकसंख्या दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्याने!

आज ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केल जात आहे. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड-19मधील सेरो सर्वेक्षणांचे महत्त्व आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर कशाप्रकारे ताण आहे, या विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहे. 11 जुलैला सकाळी आणि दुपारी अशी ही दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

व्याख्यान 1:

व्याख्याते- डॉ. जयंती एस. शास्त्री, प्राध्यापक आणि प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि बी. वाय. एल नायर रुग्णालय, मुंबई.

दिनांक- 11 जुलै, 2021

वेळ- सकाळी 11.00 वाजता

https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा.

व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती:

भारतात कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून आपण सेरो सर्वेक्षण हा शब्द वारंवार ऐकला आहे. हे सेरो सर्वेक्षण काय आहे, ते कसे केले जाते आणि लोकसंख्येमध्ये झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग समजण्यासाठी ते कसे महत्त्वाचे आहे? लसीचे वितरण किंवा कोविड उपचार केंद्रांच्या नियोजनात ते आपल्याला कशी मदत करू शकते? या सर्वेक्षणांवर साथीचे रोग विशेषज्ञ आणि सरकार अवलंबून का आहे? हे सामूहिक प्रतिकारशक्तीशी कसे संबंधित आहे?, हे या व्याख्यानातून स्पष्ट होईल.

व्याख्यान 2:

व्याख्याते- डॉ. सी. एम. लक्ष्मा, प्राध्यापक, लोकसंख्या संशोधन केंद्र, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन संस्था, बेंगळुरू.

दिनांक- 11जुलै, 2021

वेळ- दुपारी 4.30 वाजता

https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा.

व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती:

वाढती लोकसंख्या आणि चांगली जीवनशैली लोकांच्या वाढत्या संख्येसाठी अन्न, वस्त्र, निवारा, सोईसुविधा आणि करमणुकीचे सुधारित मानकांची मागणी करते. यामुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर ताण येतो आणि त्याचा ऱ्हास झाला आहे. उपभोगाच्या सवयीनुसार आणि सामाजिक संस्था आणि संसाधन व्यवस्थापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे हे आणखी तीव्र झाले आहे.

1989मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिन सुरू करण्यात आला. तेव्हा जगाची लोकसंख्या पाच अब्जपेक्षा जास्त होती.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content