Homeटॉप स्टोरीयोगाचा झाला क्रीडा...

योगाचा झाला क्रीडा प्रकारांमध्ये समावेश!

भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. आ. तांबे यांनी या मागणीसाठी विधिमंडळाच्या गेल्या तीन अधिवेशनांमध्ये आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा केला होता. आता सरकारने शासननिर्णय जारी करत योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे यामुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.

गेल्या तीन अधिवेशनापासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. हिवाळी अधिवेशनात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी, ३१ डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासित केले होते. हा निर्णय झाल्यानंतर आ. सत्यजीत तांबे यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.

योगा

राज्यातील खेळाडू, संघटक व कार्यकर्ते, मार्गदर्शक यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. परंतु, यात कुठेही योग क्रीडा प्रकाराचा समावेश नव्हता. भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

हा तर योगविद्येचा सन्मान!

बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत योगविद्येचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण इतर खेळांच्या तुलनेत योगविद्येकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कारपात्र क्रीडाप्रकारांच्या यादीत योगाचा समावेश केला, तर आणखी लोक योगाकडे वळतील, अशी ही मागणी करताना माझी धारणा होती. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचा शासन निर्णय ३१ डिसेंबरच्या आत जाहीर केला, याचा मला आनंद आहे. हा योगविद्येचा सन्मान आहे, असं मी मानतो, अशी प्रतिक्रिया आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content