Homeटॉप स्टोरीमुंबईतून एकही हिऱ्याचा...

मुंबईतून एकही हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलेला नाही!

देशातला सर्वात मोठा जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क मुंबईत उभा राहतोय, असे सांगून सूरतच्या डायमंड मार्केटमुळे मुंबईतला एकही हिरेविषयक उद्योग गुजरातला गेलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये विधानसभेत स्पष्ट केले.

सूरतमध्ये हिरे उत्पादन २०१३पासून आहे आणि त्यात आता एक नवी इमारत उभारली आहे. महाराष्ट्रातील एकही हिरेविषयक उद्योग तेथे गेलेला नाही. मुंबईतून हिरे निर्यातीचे काम मोठे आहे. त्यामुळे मुंबईचे उद्योग बाहेर जात आहेत, यात काहीही तथ्य नाही. मलबार गोल्डज ही सर्वात मोठी कंपनी आपल्याकडे १७०० कोटी गुंतवणूक करत आलेली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, अशी ग्वाही देत फडणवीस म्हणाले की, मुंबईचा हिरे व्यापारातला वाटा ७५ टक्क्यांचा आहे आणि गुजरातचा त्यामानाने खूप कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई

सरकारच्या उत्तरानंतर विरोधकांचा सभात्याग

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर न देता उलटा चोर कोतवाल को डाटे, असे वर्तन केले आहे, असा आरोप करत विधानसभेतून बहिर्गमन केले. त्यांच्यासह विरोधी पक्षांमधील सर्व सदस्य सभागृहातून कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर गेले. विरोधकांचे हे नक्राश्रू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी यानंतर केली.  

त्याआधी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाबद्दल एक ओळ टाकली म्हणजे विदर्भाचे प्रश्न होत नाहीत, असे सांगितले होते तसेच, विरोधकांना संधी असूनही त्यांनी विदर्भाचे प्रश्न मांडले नाहीत, याकडेही लक्ष वेधले.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content