Homeटॉप स्टोरीमुंबईतून एकही हिऱ्याचा...

मुंबईतून एकही हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलेला नाही!

देशातला सर्वात मोठा जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क मुंबईत उभा राहतोय, असे सांगून सूरतच्या डायमंड मार्केटमुळे मुंबईतला एकही हिरेविषयक उद्योग गुजरातला गेलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये विधानसभेत स्पष्ट केले.

सूरतमध्ये हिरे उत्पादन २०१३पासून आहे आणि त्यात आता एक नवी इमारत उभारली आहे. महाराष्ट्रातील एकही हिरेविषयक उद्योग तेथे गेलेला नाही. मुंबईतून हिरे निर्यातीचे काम मोठे आहे. त्यामुळे मुंबईचे उद्योग बाहेर जात आहेत, यात काहीही तथ्य नाही. मलबार गोल्डज ही सर्वात मोठी कंपनी आपल्याकडे १७०० कोटी गुंतवणूक करत आलेली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, अशी ग्वाही देत फडणवीस म्हणाले की, मुंबईचा हिरे व्यापारातला वाटा ७५ टक्क्यांचा आहे आणि गुजरातचा त्यामानाने खूप कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई

सरकारच्या उत्तरानंतर विरोधकांचा सभात्याग

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर न देता उलटा चोर कोतवाल को डाटे, असे वर्तन केले आहे, असा आरोप करत विधानसभेतून बहिर्गमन केले. त्यांच्यासह विरोधी पक्षांमधील सर्व सदस्य सभागृहातून कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर गेले. विरोधकांचे हे नक्राश्रू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी यानंतर केली.  

त्याआधी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाबद्दल एक ओळ टाकली म्हणजे विदर्भाचे प्रश्न होत नाहीत, असे सांगितले होते तसेच, विरोधकांना संधी असूनही त्यांनी विदर्भाचे प्रश्न मांडले नाहीत, याकडेही लक्ष वेधले.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content