Homeएनसर्कलकान्स महोत्सवात नेहा...

कान्स महोत्सवात नेहा पेंडसेंच्या गळ्यात पेठेंचा पन्ना हार

भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने त्यांच्या खास ब्रायडल कलेक्शनमधील पोल्की आणि पन्ना हार परिधान करून रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि भारतीय पारंपरिक कारागिरी व कालातीत सौंदर्यशास्त्राने उपस्थितांचे मन जिंकले.

नेहाच्या सौंदर्याला साजेसा असा हा हार कुशल कारागिरांनी तयार केला असून तो शाही वारशाची प्रेरणा आणि निसर्गदत्त पन्न्यांच्या ताजेपणाचा संगम दर्शवतो. पारंपरिक पोल्कीच्या मोठ्या सेटिंग्ज आणि हिरव्या पन्नाचे देखणे रंग तिच्या आधुनिक पोशाखाला एक अनोखा क्लासिक टच देत होते. हा हार तिच्या लूकला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि भारतीय कलाकुसरीला रेड कार्पेटवर ग्लोबल स्पॉटलाइटमध्ये आणून ठेवले. ११५ वर्षांहून अधिक काळ स्त्रियांच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला दागिन्यांच्या माध्यमातून साजरे करणाऱ्या पेठे ज्वेलर्सनी या ऐतिहासिक क्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याची आणि परंपरेची साक्ष दिली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content