Homeबॅक पेजअर्धवट शिक्षण सोडणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी...

अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी ‘नयी मंझिल’!

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 8 ऑगस्ट 2015 रोजी जागतिक बँकेकडून 50% निधीसह नयी मंझिल नावाची केंद्रीय क्षेत्र योजना (सीएसएस) सुरू केली. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा औपचारिक दाखला नाही अशा अल्पसंख्याक युवकांना म्हणजे, शाळा मध्येच सोडलेल्या किंवा मदरशासारख्या समाज शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांना याचा लाभ मिळावा हा यामागचा उद्देश आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारने अल्पसंख्याक, विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी विशेषाधिकारप्राप्त घटकांसह प्रत्येक स्तराच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सहा (6) केंद्रीय अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी देशभरात विविध योजना राबवते. या योजनेने औपचारिक शिक्षण (इयत्ता आठवी किंवा दहावी) बरोबरच कौशल्य शिक्षण देखील प्रदान केले आणि लाभार्थ्यांना उत्तम रोजगार आणि उपजीविका मिळवण्यासाठी सक्षम बनवले.

एकूण 1,00,000 च्या उद्दिष्टापैकी, 99,980 लाभार्थ्यांची मंत्रालयाने निवड केली, त्यापैकी 98,712 लाभार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि यासाठी आतापर्यंत एकूण 456.19 कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्प अंमलबजावणी संस्थांना जारी केलेल्या निधीसह लाभार्थ्यांचे राज्यनिहाय /लिंगनिहाय तपशील मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  www.minorityaffairs.gov.in उपलब्ध आहेत.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content