Homeबॅक पेजजपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने...

जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित होणार डोंगराळ रस्ते!

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या (जेआयसीए- जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था) तांत्रिक सहाय्याने, देशातील पर्वतीय रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने पाच मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे डोंगराळ प्रदेशात उच्च-गुणवत्तेचे आणि शाश्वत रस्ते प्रकल्प सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली असून यामुळे रस्त्यांचे जाळे सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

ही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी – इंडियन रोड काँग्रेस ) द्वारे प्रकाशित करण्यात आली होती. ती 7 जुलै 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत छत्तीसगडमधील रायपूर येथे संस्थेच्या 225 व्या मध्यावधी बैठकीच्या उद्घाटन समारंभात जारी करण्यात आली होती. यावेळी छत्तीसगडचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग (रस्ते विकास) चे महासंचालक व विशेष सचिव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शक तत्वांमध्ये  खालील विषयांबाबत डोंगराळ प्रदेशात रस्ते बांधणीसाठी तांत्रिक वैशिष्ठ्ये आणि सर्वोत्तम पद्धतीचा समावेश आहे.

1. डोंगराळ प्रदेशातील रस्त्यांचे नियोजन

2. प्रगत तंत्रज्ञानासह उतार संरक्षण आणि तटबंदी

3. डोंगराळ भागातील मुख्य रस्त्यांवरील बोगदा

4. प्रगत तंत्रज्ञानासह पर्वतीय पूल

5. पर्वतीय महामार्गांचे कार्यान्वयन आणि देखभाल व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक विकास सुलभ करण्यासाठी उत्तम रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालय  आणि जेआयसीए  यांनी 2016 ते 2021 या कालावधीत “पर्वतीय प्रदेशातील महामार्गांबाबत क्षमता विकास प्रकल्प” राबविण्यास सहमती दर्शवली होती.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content