Homeबॅक पेजमे महिन्यात ईएसआयमध्ये...

मे महिन्यात ईएसआयमध्ये 20.23 लाखांची नवी नोंदणी!

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) वेतनपटविषयक प्रारंभिक डेटावरून असे आढळून आले आहे की मे 2023 या महिन्यात 20.23 लाख नवीन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.

मे 2023 या महिन्यात सुमारे 24,886 नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या आहेत आणि या आस्थापना कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षा छत्राखाली आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षेची हमी मिळालेली आहे. 

या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे की, देशातील तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत जसे की, मे 2023 या महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या एकूण 20.23 लाख कर्मचार्‍यांपैकी 25 वर्षे वयोगटातील 9.40 लाख कर्मचारी नवीन नोंदणीचा बहुतांश भाग आहेत आणि ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 47% एवढी आहे.

उपलब्ध वेतनपट डेटा लक्षात घेता त्याचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते की, मे 2023 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 3.96 लाख एवढी होती. तसेच या डेटावरून असेही निदर्शनात आले की एकूण 71 ट्रान्सजेंडर कर्मचारी देखील मे 2023 या महिन्यात ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत. यावरून हेच सिद्ध होते की कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आपले फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. हा वेतनपट डेटा तात्पुरत्या स्वरूपातला आहे कारण डेटा निर्मिती ही एक सततची प्रक्रिया आहे. 

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content