Homeटॉप स्टोरी'लाडकी बहीण' राहणार...

‘लाडकी बहीण’ राहणार कायम!

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत  महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवसेनेचे सचिव आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी माध्यमांना सांगितले.

नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या माध्यमातून वकील ओवैस पेचकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, या योजनेसह इतर योजनांचा शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, या शंकेवर

लाडकी बहीण

आधारित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्या म्हणाल्या.

समाजातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये साह्य देणारी योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे सरकारची प्रतिमा उंचावली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याने त्यांनी या माध्यमातून या योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यावर हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळली, असेही कायंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील आव्हान फेटाळल्यानंतर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिला हप्ता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून दिला जाणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत महिलांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याचे सांगितले आहे.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content