Homeटॉप स्टोरी'लाडकी बहीण' राहणार...

‘लाडकी बहीण’ राहणार कायम!

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावत  महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री भावाची भेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवसेनेचे सचिव आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी माध्यमांना सांगितले.

नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटन्ट यांच्या माध्यमातून वकील ओवैस पेचकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, या योजनेसह इतर योजनांचा शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल, या शंकेवर

लाडकी बहीण

आधारित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्या म्हणाल्या.

समाजातील गरजू महिलांना दरमहा १५०० रुपये साह्य देणारी योजना अतिशय लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे सरकारची प्रतिमा उंचावली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याने त्यांनी या माध्यमातून या योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यावर हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगून याचिका फेटाळली, असेही कायंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील आव्हान फेटाळल्यानंतर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे योजना लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पहिला हप्ता १४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून दिला जाणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत महिलांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढल्याचे सांगितले आहे.

Continue reading

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...
Skip to content