Homeन्यूज ॲट अ ग्लांसवाद निर्माण करून...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न त्याने केला. कामराच्या हास्यव्यंग्यावर टिप्पणी करताना फडणवीस म्हणाले की, कामराला माहीत हवे की, राज्यात कोण खुद्दार आणि कोण गद्दार! हे २०२४ च्या निवडणुकीतून राज्यातील जनतेने ठरवले आणि हिन्दूहृदयसम्राट ठाकरे यांच्या विचाराचा वारसा कुणाकडे आहे, हेही जनतेने ठरवले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्यावर कॉमेडी करण्याच्या नावाखाली अपमानास्पद व्यंग्य करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरा याच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेur मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. त्याआधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या हौद्यात जमा होऊन गदारोळ केला आणि कामराविरुद्ध कारवाईचा आग्रह धरल्यानंतर पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

कामरा याने एकनाथ शिन्दे यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल सभागृहात अर्जुन खोतकर यांनी मुद्दा उपस्थित केला. सभागृहाबाहेरही कामरा याच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. मख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हास्यव्यंग्य किंवा अभिव्यक्ती याचा पुरस्कार करणारे आपण सर्व आहोत आणि अशा व्यंग्यातून त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न केलेला नाही. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य केले जाणार नाही. कामरा यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेल्या विरोधी पक्षातील काही सदस्यांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामरा याची शिन्दे यांच्यावरील टिप्पणी करत खिल्ली उडवणारी कविता प्रसारित झाली आणि विरोधकांमधील एकाने ट्विट केले, एकाची क्लिप आली. मग दुसऱ्याची क्लिप आली. मग प्रश्न असा येतो की या कामराला सुपारी दिली गेली होती का?

फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी जे छोटे लाल संविधान घेऊन फिरतात, त्याच्याबरोबरचा फोटो या कामराने ट्विट केला आहे. संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्वातंत्र्य अमर्याद नाही. तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता तेव्हा ते स्वातंत्र्य मर्यादित होते. त्याने अपमानजनक शब्द वापरले आहेत. त्याने माझ्यावर किंवा शिन्देसाहेबांवर कविता करावी ती आम्हीही ऐकू. पण अपमानजनक काम सुपारी घेऊन केले तर कारवाई केलीच जाईल. त्याच्यावर कारवाई केली की मग संविधानाचे स्वातंत्र्य गेले असे म्हणत छात्या बडवू नका. विनाकरण प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, कारण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम करणारे हे लोक आहेत. त्याचपद्धतीने त्या रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांवर घाणेरडे शब्द वापरले तर योग्य नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. सध्या लेफ्ट, लिबरल यांचे उद्देश एकच आहेत आणि ते म्हणजे देशातील मानके, संस्थांवरचा विश्वास उडवणे. पण त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये म्हणून कामरा याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content