Homeचिट चॅटमुंबईत साजरा झाला...

मुंबईत साजरा झाला जयस्वाल महोत्सव

जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जायसवाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचं नुकतंच आयोजन केलं होतं. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल समजाचे असंख्य लोक एकत्र आले होते. यावेळी रोजगार मेळावे, वैद्यकीय शिबिरे, करिअर समुपदेशन, गुंतवणदारांसाठी जागरूकता कार्यक्रम, प्रेरक भाषणे, महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आणि नृत्य सादरीकरण, विनोदी कविता वाचन आणि पतंग महोत्सव यासारखे विशेष कार्यक्रम मालाड चारकोप नाका येथील सरस्वती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १३ आणि १४ जानेवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते.

सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी राजदीपकुमार गुप्ता म्हणाले की, या कार्यक्रमाची रचना एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली, ज्यामध्ये मनोरंजनासह नवोदित प्रतिभा आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना रोजगार प्राप्तीसाठी व्यासपीठ मिळेल.

अखिल मुंबई जयस्वाल सभा, श्री विंध्यवासिनी सेवा मंडळ, जयस्वाल सेवा संस्था, जयस्वाल समाज संस्था, कलवार समाज संघ, जयस्वाल समाज सेवा संस्था, जयस्वाल फाऊंडेशन आणि जयस्वाल परिवार फाउंडेशन यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.

संपूर्ण जयस्वाल समाजाला एकत्र आणणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला, पुरुष आणि मुलांसाठी सामाजिक जागृती मोहिमेपासून आरोग्य शिबिरे, शैक्षणिक ते आर्थिक कार्यक्रम आणि तरुणांसाठी रोजगार मेळावे ते महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमांतून करण्यात आले, असे सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी संदिप गुप्ता म्हणाले.

सरस्वती देवी चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत गुप्ता आणि संचालक मंडळ, रूट मोबाईल यांच्या नेतृत्त्वाखाली हा महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी संतोषानंद देवजी महाराज उपस्थित होते. जयस्वाल महोत्सवात समाजातील प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत हे समाजाच्या दृषटीने अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे, असे स्वामी संतोषानंद म्हणाले.

जयस्वाल युथ फेडरेशनचे अध्यक्ष विश्वनाथ कलवार म्हणाले की, जयस्वाल समाजात एकोपा पसरवण्यासाठी ओळखला जातो. समाजाला मदत करणे आणि एकमेकांमधील आदर वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

अंतिम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पाहुणे, व्यावसायिक, उद्योजक आणि उद्योगपतींचा सत्कार करण्यात आला आणि ‘संगीत संध्या’ने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये रमा देवी- लोकसभा प्रोटोकॉल स्पीकर, श्रीपाद नाईक- पर्यटन आणि बंदरे राज्यमंत्री, संजय जैस्वाल- लोकसभा खासदार आणि बिहार भाजपचे माजी अध्यक्ष, कृष्णा प्रसाद- IPS आणि ADGP फोर्स वन, महाराष्ट्र सरकार, सिद्धार्थ जैस्वाल- IRS जॉइंट कमिशनर कस्टम आणि एक्साईज मुंबई यांनीदेखील या महोत्सवाला उपस्थिती दर्शवली होती.

Continue reading

अखेर इराणपुढे अमेरिकेने हात टेकले! युद्धविराम!! शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा!!!

४८ तासांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराण बेचिराख करू, असा अत्यंत गंभीर इशारा देणाऱ्या अमेरिकेने अखेर इराणपुढे हात टेकले. इराणच्या १० अटींच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्याचे मान्य करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांकरीता एकतर्फी युद्धविराम...

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...
Skip to content