Homeचिट चॅटजैनाचार्य युगभूषणसुरी प्रथमच...

जैनाचार्य युगभूषणसुरी प्रथमच TISSच्या कॅम्पसमध्ये!

इतिहासात प्रथमच, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS) जैन आध्यात्मिक साधू, तीर्थंकर श्री महावीर यांचे 79वे उत्तराधिकारी, जैनाचार्य युगभूषणसुरी, यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ‘सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील भेदभावाचे मूळ कारण’ या विषयावरील परिषदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले.

‘सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील भेदभावाचे मूळ कारण’, या विषयावरील परिषदेत जैनाचार्य म्हणाले की, भेदभावाची पद्धतशीरपण खोलवर रुजलेली कारणे पाश्चात्य शक्तींनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापित केलेल्या जागतिक व्यवस्थेत अंतर्भूत आहेत. अशा जागतिक व्यवस्थेचे कारण वर्णद्वेषात रुजले आहे. गरिबी हा अपघात नाही तर ती कृत्रिम आहे. हे तयार करण्यात आलेले दारिद्र्य आणि परिणाम अविकसित राष्ट्रांतल्या भेदभावाचे प्रमुख कारण आहे. वसुधैव कुटुंबकमच्या तत्त्वज्ञानावर आधारित सुधारणा हाच त्यावरील उपाय आहे.

परिसंवादासोबतच आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समस्यांवरील प्राचीन धर्मग्रंथांमधून काढलेले निष्कर्ष प्रदर्षित केले गेले. प्राचीन भारत आणि आधुनिक भारतातल्या मूलभूत सिद्धांताची उदाहरणात्मक तुलना या प्रदर्शनात करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले 200हून अधिक मान्यवर उपस्थित होते. त्यात हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, रिलायन्सचे कार्यकारी संचालक दिलीप देराई, प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. भास्कर शाह, फॉर्म इझीचे सहसंस्थापक धवल शाह आणि हार्दिक शाह, आयआयटी बॉम्बेच्या प्रा. अहोना रॉय आणि सिडनॅहम महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. कौशल जैन आदींचा समावेश होता.



Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content