Homeपब्लिक फिगरभारतीयांना अमेरिकेत दुसऱ्या...

भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्या कुणालातरी निवडून आणायचे होते!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन कार्यकाळात भारतातील मतदान प्रक्रियेसाठी अमेरिकेने दिलेल्या 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या एफआयआय प्रायोरिटी शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्याला कुणाला तरी निवडून आणायचे होते, असा अप्रत्यक्ष आरोपही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारतातील मतदान प्रक्रियेसाठी आपल्याला 21 दशलक्ष खर्च करण्याची आवश्यकता का आहे? मला वाटते की, ते दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला भारत सरकारला ठणकावून सांगावे लागेल. रशियाने अमेरिकेत सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केले. त्या तुलनेत भारतीय खर्च खूप मोठा होता. रशियाने दोन हजार डॉलर्स काही इंटरनेट जाहिरातींवर खर्च केला.

ट्रम्प यांनी भारताची मजबूत आर्थिक स्थिती आणि अमेरिकन वस्तूंवरील उच्च करांकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले की, भारताला करांतून खूप पैसे मिळाले. भारत हा अमेरिकेच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतातील शुल्क खूपच जास्त असल्याने अमेरिकी उद्योग तिथे आता क्वचितच प्रवेश करू शकतात. हाच मुद्दा धरून ट्रम्प यांनी परदेशातील मतदानावर लाखो डॉलर्स खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ट्रम्प पुढे म्हणाले की, मला भारताबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौऱ्यावर आले होते; पण आम्ही भारतातील मतदानासाठी 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. अमेरिकेतील मतदानाचे काय? अरे, आम्ही इकडे 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. त्याला लॉकबॉक्स म्हणतात.

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content