Homeबॅक पेजजीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत...

जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारत अव्वल स्थानी!

संयुक्त अरब अमिरातीमध्ये अल एन येथे 3 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान आयोजित 34व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) 2023 मध्ये भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हे शक्य झाले सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमुळे, भारताने प्रथमच सुवर्ण कामगिरी करून आयबीओमध्ये पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

सुवर्ण कामगिरी करणारे या वर्षीचे विद्यार्थी 

  • ध्रुव अडवाणी (सुवर्णपदक) बंगळुरू, कर्नाटक
  • ईशान पेडणेकर (सुवर्णपदक) कोटा, राजस्थान
  • मेघ छाबडा (सुवर्णपदक) जालना , महाराष्ट्र
  • रोहित पांडा (सुवर्णपदक) रिसाली, छत्तीसगड

विद्यार्थ्यांच्या चमूसोबत प्रा. मदन एम. चतुर्वेदी (माजी वरिष्ठ प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ) आणि डॉ. अनुपमा रोनाड (एचबीसीएसई, टीआयएफआर ) हे दोन प्रमुख आणि  डॉ. व्ही. बिनॉय (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगळुरू) आणि डॉ रामभादूर सुबेदी (एनआयआरआरएच, मुंबई) हे दोन वैज्ञानिक निरीक्षक होते.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 76 देशांतील 293 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके प्रदान करण्यात  आली. भारताव्यतिरिक्त केवळ सिंगापूर या देशाने या स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली.

यापूर्वी, भारताने खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र (2008, 2009, 2010, 2011, 2015 आणि 2021 मध्ये), भौतिकशास्त्र (2018 मध्ये) आणि कनिष्ठ विज्ञान (2014, 2019, 2021 आणि 2022 मध्ये) पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content