Homeब्लॅक अँड व्हाईटचालू आर्थिक वर्षात...

चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 21 टक्क्यांची वाढ!

या आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबर 2023पर्यंत) तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये, याच कालावधीत 11,35,754 कोटी रुपये संकलन झाले होते, ज्यात 20.66% वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाची प्राथमिक आकडेवारी (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) 15,95,639 कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही रक्कम 13,63,649 कोटी रुपये होती. यंदा, आर्थिक वर्ष 2022-23 च्या संकलनाच्या तुलनेत 17.01% वाढ झाली आहे.

जीएसटी

15,95,639 कोटी रुपयांच्या समग्र कर संकलनात, 7,90,049 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 8,02,902 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. किरकोळ संकलनात, 6,25,249 कोटी रुपयांचा अग्रिम कर समाविष्ट आहे. तर, 7,70,606 कोटी रुपयांचा उद्गम  कर समाविष्ट आहे, 1,48,677 कोटी रुपये स्वयं-मूल्यांकन कर, 36, 651 कोटी रुपये नियमित मूल्यांकन कर आणि 14, 455 कोटी रुपये इतर किरकोळ कर संकलित झाला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठीच्या  प्राथमिक आकडेवारीनुसार, 6,25,249 कोटी रुपये अग्रिम कर संकलित झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम, 5,21,302 कोटी रुपये इतकी होती, ज्यात यंदा 19.94% ची वाढ झाली आहे. या 6,25,249 कोटी रुपयांच्या अग्रिम करांमधे, 4,81,840 कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि 1,43,404 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. 17 डिसेंबरपर्यंत, 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे, 2,25,251 कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content