Homeडेली पल्समहाराष्ट्रात पुढचे तीन...

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार!

भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट लागू आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

रेड अलर्ट: ४ ऑगस्ट – सातारा, पुणे आणि पालघर

ऑरेंज अलर्ट: ४ ऑगस्ट – सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ ऑगस्ट – सातारा

यलो अलर्ट: संपूर्ण विदर्भ (३ ते ७ ऑगस्ट), कोल्हापूर (४ ऑगस्ट) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ ऑगस्ट), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (६ ऑगस्ट)

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content