Homeकल्चर +मुस्लिम मराठी साहित्य...

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना  म. इकबाल डांगे ह्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा साहित्यिक व इतर क्षेत्रातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या संस्थेतर्फे हमीद दलवाई पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत.

त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या “फर्ज फाऊंडेशन”च्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग माजी कार्याध्यक्षा व सध्या जवाहर बालमंचच्या त्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी सारस्वत तसेच मुस्लिम समाजाकडून विशेषतः महिला वर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content