Homeकल्चर +मुस्लिम मराठी साहित्य...

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना  म. इकबाल डांगे ह्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा साहित्यिक व इतर क्षेत्रातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या संस्थेतर्फे हमीद दलवाई पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत.

त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या “फर्ज फाऊंडेशन”च्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग माजी कार्याध्यक्षा व सध्या जवाहर बालमंचच्या त्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी सारस्वत तसेच मुस्लिम समाजाकडून विशेषतः महिला वर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Continue reading

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...
Skip to content