Homeमुंबई स्पेशलआनंद लुटा फळाफुलांच्या...

आनंद लुटा फळाफुलांच्या प्रदर्शनाचा एरोप्लेन गार्डनमध्ये!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

गुलाब, झेंडू ,झिनीया, शेवंती, विविध प्रकारच्या ऑर्किड यांचे मिळून सुंदर देखावे याठिकाणी तयार करण्यात आले आहेत. यात विविध रंगांच्या फुलांच्या सजावटीसोबत प्रत्येक रंगाचा आपल्या आयुष्यात असलेला अर्थ स्पष्ट केला आहे. ‘चला जगूया रंग आयुष्याचे’ या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. त्यातले विविध रंग, आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे. लाल रंग प्रेम दर्शवतो. हिरवा रंग सृष्टी आणि त्याची वाढ दर्शवतो. पिवळ्या रंग आनंद, नारंगी रंग नवनिर्मिती असे विविध रंग त्याचे अर्थ आणि त्या रंगांच्या फुलांनी निर्माण केलेल्या कलाकृती याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

आनंद, आशा, अपेक्षा, ज्ञान, योग, अध्यात्मिकता, प्रेम, विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुलं यांचा मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. फळे, फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज, रविवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत व उद्या, सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content