Homeमुंबई स्पेशलआनंद लुटा फळाफुलांच्या...

आनंद लुटा फळाफुलांच्या प्रदर्शनाचा एरोप्लेन गार्डनमध्ये!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांनी पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूज पश्चिम येथील जुहू लायन्स म्युनिसिपल पार्क अर्थात एरोप्लेन गार्डन येथे फळे फुले भाज्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

गुलाब, झेंडू ,झिनीया, शेवंती, विविध प्रकारच्या ऑर्किड यांचे मिळून सुंदर देखावे याठिकाणी तयार करण्यात आले आहेत. यात विविध रंगांच्या फुलांच्या सजावटीसोबत प्रत्येक रंगाचा आपल्या आयुष्यात असलेला अर्थ स्पष्ट केला आहे. ‘चला जगूया रंग आयुष्याचे’ या संकल्पनेवर आधारित विविध फुलांच्या मदतीने इंद्रधनुष्य तयार करण्यात आलेला आहे. त्यातले विविध रंग, आपल्या जीवनात असलेले महत्त्व असा प्रदर्शनाचा आशय आहे. लाल रंग प्रेम दर्शवतो. हिरवा रंग सृष्टी आणि त्याची वाढ दर्शवतो. पिवळ्या रंग आनंद, नारंगी रंग नवनिर्मिती असे विविध रंग त्याचे अर्थ आणि त्या रंगांच्या फुलांनी निर्माण केलेल्या कलाकृती याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

आनंद, आशा, अपेक्षा, ज्ञान, योग, अध्यात्मिकता, प्रेम, विश्वास अशा विविध मानवी भावना दर्शवणारे रंग आणि त्यांची फुलं यांचा मिळून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. फळे, फुले, भाज्या, आयुर्वेदिक वनस्पती, हंगामी फुलझाडे या सर्वांनी युक्त हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज, रविवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत व उद्या, सोमवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content