Homeबॅक पेजपीएम-कुसुम योजनेखाली 2.45...

पीएम-कुसुम योजनेखाली 2.45 लाख सौर ऊर्जा पंपाची उभारणी!

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (PM- KUSUM), अर्थात पीएम-कुसुम योजने अंतर्गत 30 जून, 2023 पर्यंत प्रत्येकी 2 मेगावॅट क्षमतेच्या लहान प्रकल्पांसह एकूण 113.08 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत, या तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्यासह देशभरात, 2.45 लाख सौर ऊर्जा पंप बसवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना परवडणारी वीज उपलब्ध करण्यासाठी, मार्च 2019 मध्ये पीएम-कुसुम योजना सुरु करण्यात आली आणि नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. ही योजना मागणीवर आधारित असून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या मागणीवर आधारित क्षमतांचे वितरण केले जाते.

पीएम-कुसुम योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घ्यायच्या जमिनीची किंमत नमूद केलेली नाही. मात्र, 12.07.2023 रोजी जारी करण्यात आलेली सुधारित योजना मार्गदर्शक तत्त्वे, राज्यांना सध्याच्या ग्रीड-कनेक्टेड कृषी पंपांचे सोलरायझेशन (सौर-उर्जाकरण) आणि फीडर स्तरावरील सौर-ऊर्जा करणाद्वारे जमीन भाडेपट्ट्याचे दर जाहीर करण्याची परवानगी देतात.

नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content