Homeचिट चॅटयंदाच्या भक्तिरास नवरात्र...

यंदाच्या भक्तिरास नवरात्र महोत्सवाचे भूमीपूजन संपन्न

मुंबईतले बोरिवली हे नवरात्रोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या “भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024″साठी भूमिपूजन, वास्तुपूजन आणि कलश पूजन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या “भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024″च्या भूमिपूजनप्रसंगी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी सादर केलेल्या आणि दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात अधिकाधिक बोरिवली स्थानिकांना तसेच मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे. यावेळी सुनील राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भक्तिरास नवरात्र महोत्सवात नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि संगीत असणार आहे. बोरिवली हे गुजराती सामाजिक संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. यावर्षी बॉलीवूड गाण्यासह पारंपरिक संगीतावर नवरात्रोत्सवाची रंगत द्विगुणित करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content