Homeन्यूज अँड व्ह्यूजमतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही...

मतभेदांच्या कोलाहलात समानतेचेही धागे सापडतात!

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वागण्यात आणि जगण्याच्या पद्धतीबाबत मतभेद आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माणूस म्हणून समानतेचे धागे सापडू शकतात आणि तेच मी माझ्या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात एका मच्छिमाराची कथा आहे ज्याचे कणखर व्यक्तिमत्व आहे आणि दुरावलेल्या मुलीशी त्याची झालेली भेट याचे चित्रण आहे, असे ‘द फिशरमन्स डॉटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक एदगार डी लुक जेकोम म्हणाले.

54व्या इफ्फीच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शक जेकोम यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. मच्छीमार वडील आणि त्याची दुरावलेली मुलगी पुन्हा एका निर्जन बेटावर भेटतात आणि ते त्यांच्या त्रासदायक भूतकाळ आणि वर्तमानाशी जुळवून घेतात, असे सांगत एदगार यांनी चित्रपट निर्मितीप्रती त्यांचे दृष्टिकोन आणि त्यांच्या सिनेमॅटिक कल्पनाशक्तीला चालना देणारे घटकदेखील सामायिक केले. त्यांचे आजोबा एक मच्छिमार होते आणि त्यांचे जीवन या चित्रपटासाठी प्रेरक ठरले, असेही ते म्हणाले.

या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पर्यटन, बंदरे आणि इमारतींमुळे सांता मार्ताचे मच्छिमार विस्थापित झाले आणि त्याचप्रमाणे ट्रान्स समाजालाही हलविण्यात आले. या चित्रपटाची कल्पना या दोन्ही समुदायांना एका कथेत जोडणे आणि एकत्र आणणे ही आहे”.

‘द फिशरमन्स डॉटर’ या चित्रपटाद्वारे एदगार र डी लुके जेकोम पदार्पण करत आहे आणि मच्छिमार आणि ट्रान्स समुदाय या दोघांचा अनोखा दृष्टीकोन यात पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. एदगर डी लुके जेकोमचा लघुपट सिन रेग्रेसो (2007) बियारिट्झ आणि सॅंटियागो येथील महोत्सवांमध्ये होता. त्याने युनिव्हर्सिडॅड डेल नॉर्टे येथे कम्युनिकेशन्समध्ये प्रावीण्य मिळवले आणि रॉबर्टो फ्लोरेस प्रिएटो यांच्या रुइडो रोसा (2014) आणि लिबिया स्टेला गोमेझ यांच्या एला (2015)मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक होते. त्याच्या तीन पटकथांसाठी एफडीसीचे पटकथालेखन उत्तेजनपर पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. ते अनेक वर्षे युनिव्हर्सिडॅड डेल मॅग्डालेना येथे प्राध्यापक होते.

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content