Homeबॅक पेजपुढच्या सर्व निवडणुका...

पुढच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रच लढणार!

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुती एकत्रितपणे लढेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्या जागावाटपाचे सूत्रही निश्चित झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर आज माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजपा एकत्रपणे लढवेल, असे या बैठकीत निश्चित झाल्याचे सांगितले.

अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले. त्याचवेळेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दलही यावेळी चर्चा झाली. येत्या 19 जूनपूर्वी म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे असे कळते.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात महिलांनाही स्थान दिले जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्र्याला किमान एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली जाईल. किंबहुना जो लोकसभेसाठी निवडणुकीत खासदार निवडून आणण्याची क्षमता राखेल त्यालाच मंत्रिपदाचे बळ दिले जाईल. याशिवाय सध्या मंत्रिमंडळात असलेल्या परंतु केंद्रीय नेतृत्त्वाच्या दृष्टीने अकार्यक्षम ठरणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि त्या जागा खासदार निवडून आणणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातूनच भरल्या जातील, असे यावेळी ठरवण्यात आल्याचे समजते.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हानिकारक ठरणारी वक्तव्ये करणाऱ्या मंत्रिमंडळातील सदस्यांना वेळीच आवरण्याच्या सूचनाही अमित शाह यांनी या बैठकीत केल्याचे बोलले जाते.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content