Homeटॉप स्टोरीAIमुळे साखरेच्या उताऱ्यात...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला. बारामतीचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) आणि मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला.

AI आणि सॅटेलाइट इमेजिंगच्या मदतीने पिकांची वाढ, पाण्याची गरज, रोग, हवामान याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्यामुळे पाणी वापर 50%ने कमी होतो. प्रति एकर उत्पादन 73 टनांवरून 150 टनांपर्यंत वाढू शकते आणि साखरेचा उतारा 10%पेक्षा जास्त मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि साखर कारखान्यांचा कार्यकालही वाढतो.

AI परिणामकारकता कशी मोजली गेली?

तुलनात्मक प्रयोग: दोन वेगवेगळ्या प्लॉट्सवर – एकावर पारंपरिक पद्धतीने आणि दुसऱ्यावर AI तंत्रज्ञान वापरून ऊसाची लागवड केली गेली.

ऊस

मोजमापाचे निकष: प्रति एकर उत्पादन (टनमध्ये)

  – साखरेचा उतारा (सुक्रोज कंटेंट)

  – पाण्याचा वापर

  – खत आणि कीटकनाशकांचा वापर

  – खर्च आणि नफा

  – पीकवाढीचा कालावधी (महिन्यांत)

डेटा संकलन: IoT सेन्सर्स, सॅटेलाइट इमेजिंग, हवामान केंद्र, जमिनीचे परीक्षण, आणि मोबाइल ॲपद्वारे रिअल-टाइम डेटा गोळा केला गेला.

प्रमुख वाण: CO 86032, CO M 265, MS 10001, PDN 15012, CO VSI 8005, CO VSI 18121. यापैकी CO M 265 वाणाने 150.10 टन प्रति एकर, PDN 15012 ने 120.40 टन/एकर, CO VSI 8005 ने 104.78 टन/एकर उत्पादन दिले.

शेतकऱ्यांचा सहभाग: पहिल्या टप्प्यात 1,000 शेतकरी सहभागी; पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार.

सेंद्रिय कर्ब: AI तंत्रज्ञानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब 1.0% राखला गेला, पारंपरिक शेतीत तो 0.68% होता.

या प्रयोगातील पूरक डेटा आणि तुलनात्मक निकाल हे महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content