Sunday, September 8, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजखोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक...

खोट्यापेक्षा अर्धसत्य अधिक घातक!

सर्व सत्य माहिती असूनही, खोटं बोलून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. खोटं बोल पण रेटून बोल करणार्‍याच्या वृत्तीला आपण काही करू शकत नाही. खोट्यापेक्षा अर्धसत्य समाजासाठी अधिक घातक असते, असा पलटवार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर केला.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेतून अध्यक्ष राहुल नार्वेकर, निवडणूक आयोग, राज्यपाल यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

आपण सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या चाकोरीत राहून आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेच्याआधारे निर्णय घेतले आहे. मला माझ्या मर्जीनुसार निर्णय घेण्याचा फार वाव नव्हता. तरी, माझ्यावर आरोप केला जात आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाने मला दिलेला आदेश पाहिला तर त्यात मला असं सांगितलं गेलं होतं की आधी मूळ राजकिय पक्ष कोणता हे ठरवा आणि ते ठरवत असताना तर दोन गटांत घटनेच्या संविधानावरून वाद असतील तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जी घटना आहे त्याचा आधार घ्या. त्यातही आपल्याला पुन्हा पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ असे तिन विकल्पसुध्दा देण्यात आले होते. मी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ट्रिपल टेस्टनुसार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेचा आधारे निर्णय दिला.

अर्धसत्य

झोपलेल्यांना जागं करता येतं. पण झोपल्याचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. सारं सत्य माहिती असताना खोटी माहिती देऊन जनतेची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी, जनतेला गृहीत धरुन चालत नाही. राज्यातील जनता सूज्ञ आहे. काय तो अंतिम निर्णय ते घेतील, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार, मी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यांच्याकडून पक्षाची घटना मागवून घेतली. त्या पत्राला उत्तर म्हणून निवडणूक आयोगाने १९९९चीच घटना आपल्याकडे असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेची घटना सुधारित आहे का याबाबतदेखील विचारणा केली असता, आयोगाने सांगितलं की, १९९९नंतरची कोणतीही घटना अथावा सुधारणाविषयक कुठलेही कागदपत्र आमच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही. ठाकरे गटाकडून २०१३ आणि २०१८ची घटनादुरुस्ती दिल्याचा दावा खोटा असल्याचं नार्वेकर म्हणाले. त्यांनी २०१३ आणि २०१८ची पत्र वाचून दाखवत ठाकरेंचं पितळ उघडं पाडलं.

अनिल परब सातत्याने २०१३ आणि २०१८चं पत्र दाखवतात, परंतु ते वाचून दाखवत नाहीत. कारण त्यात निवडणुकीचा निकाल पाठवला आहे. मात्र सुधारित घटनेबाबत कोणताही उल्लेख त्या पत्रात नसून, सोबत कुठलाही घटनादुसरुस्तीसंदर्भातला कागद त्यांनी आयोगाला दिलेला नाही. अथवा सुधारित घटना सादर केली. माझ्यासमोर जो युक्ती वाद केला किंवा कागदपत्र सादर केलीत यात कुठेही याबाबींचा उल्लेख ठाकरे गटाकडून करण्यात आला नाही. अशी माहिती देत नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावला.

विधिमंडळ, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था आणि संवैधानिकपदांबाबत अपशब्द काढणार्‍यांना, घटनेने दिलेल्या संस्था आणि पदांबाबत अनादर करणार्‍यांना, टिका-टिपण्णी करणार्‍यांना घटना, संविधानाचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content