Friday, October 18, 2024
HomeArchiveहाजी अलीला उड्डाणपूल...

हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

Details
हाजी अलीला उड्डाणपूल उभारा : मंगल प्रभात लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील हाजी अली दरगाह आणि पवित्र तलाव बाणगंगा ही दोन्ही आस्थेची ठिकाणे आहेत. या प्रसिद्ध ठिकाणी दररोज हजारो लोक, भाविक येत असतात. मात्र, येथे आल्यावर लोकांना वाहतूक कोडींसह काही अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबरोबरच बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याची गरज आहे, अशी मागणी मलबार हिलचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आमदार मंगल प्रभात लोढा यांनी एका निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही लोढा यांनी विधानसभेत हाजी अली येथील वाहतूक कोंडी आणि बाणगंगेला जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करण्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. यावेळी हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले होते.

 

मुंबईमधील पश्चिम उपनगरातील लोकांना दक्षिण मुंबईत यायचे झाल्यास हाजी अली जंक्शनलाच वळसा घालून यावे लागते. यामुळे हाजी अली जंक्शन येथे सतत वाहतूक कोंडी होऊन चारचाकी गाड्यांची मोठी रांग लागलेली असते. हजारो वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होतेच शिवाय पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. यातून सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारावा अशी मागणी सातत्याने आमदार लोढा यांनी लावून धरली आहे. हाजी अली जंक्शन येथे उड्डाणपूल कसा गरजेचा आहे याचे सादरीकरण आणि माहितीही वेळोवेळी सरकारी पातळीवर दिली आहे.

बाणगंगा हे मुंबईतील सर्वात पौराणिक धर्मस्थळांपैकी एक असून, हेरिटेज यादीतील एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. बाणगंगा येथे सुमारे दहा हजारांहून अधिक लोक राहतात. परंतु, येथील रॉकी हिल मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. येथील स्थानिकांना पीडब्ल्यूडी कॉलनी येथून जावे लागते. शिवाय रॉकी हिल मार्ग बंद केल्याने बाणगंगा परिसरात अग्निशमन दलाची गाडी अथवा रूग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व बाजू लक्षात घेता बाणगंगेकडे जाण्यासाठी रॉकी हिल मार्ग खुला करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.”
 

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content