Homeडेली पल्सउद्यापासून मुंबईतले काही...

उद्यापासून मुंबईतले काही पोस्टमन फिरणार दुचाकीवर!

मुंबईच्या नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने टपालसेवा पुरविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एका पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पाच टपाल कार्यालयातील पोस्टमनना 200हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयामधून उद्या, 4 डिसेंबरला याचा शुभारंभ होणार आहे.

भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने हा एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्सची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी टपाल खात्याने पायी पत्रे पोहोचवण्यापेक्षा नवीन स्मार्ट पर्याय अंगिकारण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाअंतर्गत टीव्हीएस व्हीएमएसच्या सहयोगाने पोस्टमन/पोस्टवुमनसाठी इलेक्ट्रिक दुचाकी दिली जाणार असून त्याद्वारे समग्र सेवा पुरवली जाणार आहे. चकाला, मुंबई जीपीओ, सायन, दादर व काळबादेवीसहित मुंबईत नव्याने सुरु झालेल्या वितरण केंद्रांमधील पोस्टमन/पोस्टवुमनना टपाल वितरणासाठी टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक दुचाकी दिल्या जाणार आहेत. रोज येणारी पत्रे, पार्सल व अकौंट्स टपालसारख्या सर्व प्रकारच्या टपालाचे वितरण करण्यासाठी पोस्टमन/पोस्टवूमन या वाहनांचा वापर करतील.

या उपक्रमाअंतर्गत 211 दुचाकी देण्यात येणार असून त्यांचे संचालन सुरळीत, पर्यावरणस्नेही व रास्त दरात होण्यासाठी टपाल कार्यालयाजवळ विशेष चार्जिंग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हा पथदर्शी प्रकल्प उद्या सकाळी 10 वाजता चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयातून सुरु होणार आहे. महाराष्ट्र व गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग , भारतीय टपालच्या मुंबई क्षेत्राच्या टपाल सेवा संचालक काईया अरोरा तसेच टीव्हीएस व्हीएमएसचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील. 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content