Homeडेली पल्सउद्यापासून मुंबईतले काही...

उद्यापासून मुंबईतले काही पोस्टमन फिरणार दुचाकीवर!

मुंबईच्या नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने टपालसेवा पुरविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एका पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील पाच टपाल कार्यालयातील पोस्टमनना 200हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयामधून उद्या, 4 डिसेंबरला याचा शुभारंभ होणार आहे.

भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने हा एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्सची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी टपाल खात्याने पायी पत्रे पोहोचवण्यापेक्षा नवीन स्मार्ट पर्याय अंगिकारण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाअंतर्गत टीव्हीएस व्हीएमएसच्या सहयोगाने पोस्टमन/पोस्टवुमनसाठी इलेक्ट्रिक दुचाकी दिली जाणार असून त्याद्वारे समग्र सेवा पुरवली जाणार आहे. चकाला, मुंबई जीपीओ, सायन, दादर व काळबादेवीसहित मुंबईत नव्याने सुरु झालेल्या वितरण केंद्रांमधील पोस्टमन/पोस्टवुमनना टपाल वितरणासाठी टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक दुचाकी दिल्या जाणार आहेत. रोज येणारी पत्रे, पार्सल व अकौंट्स टपालसारख्या सर्व प्रकारच्या टपालाचे वितरण करण्यासाठी पोस्टमन/पोस्टवूमन या वाहनांचा वापर करतील.

या उपक्रमाअंतर्गत 211 दुचाकी देण्यात येणार असून त्यांचे संचालन सुरळीत, पर्यावरणस्नेही व रास्त दरात होण्यासाठी टपाल कार्यालयाजवळ विशेष चार्जिंग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हा पथदर्शी प्रकल्प उद्या सकाळी 10 वाजता चकाला एमआयडीसी टपाल कार्यालयातून सुरु होणार आहे. महाराष्ट्र व गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग , भारतीय टपालच्या मुंबई क्षेत्राच्या टपाल सेवा संचालक काईया अरोरा तसेच टीव्हीएस व्हीएमएसचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील. 

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content