Homeकल्चर +१४ नोव्हेंबरपासून मुंबईत...

१४ नोव्हेंबरपासून मुंबईत वार्षिक संगीत महोत्सवाची मेजवानी

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १४ नोव्हेंबरला सुप्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ पं. योगेश सम्सी यांची आहे. १५ नोव्हेंबरला जयपूर घराण्याचे नामवंत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर अमेय बिचू साथ करतील. १६ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सवाचा समारोप सुविख्यात गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर अनंत जोशी साथ देतील.

हे सर्व कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले  वातानुकूलीत सभागृहात रोज संध्याकाळी पाच वाजता सुरू होतील. हा संगीत महोत्सव विनाशुल्क असून गानरसिकांना आसनमर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या प्राधान्य यानुसार प्रवेश मिळेल. तरी रसिकांनी या मैफलींचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content