Homeचिट चॅटलाईफ रिपब्लिकमध्ये उद्यापासून...

लाईफ रिपब्लिकमध्ये उद्यापासून भव्य नवरात्रौत्सव!

पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या जांभे ग्रामपंचायतीत असलेल्या लाईफ रिपब्लिक टाऊनशिपमधील रहिवाशांकडून उद्यापासून म्हणजेच येत्या 22 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाईफ रिपब्लिकमधील अग्निशमन केंद्राच्या बाजूला असलेल्या ए-३ येथील मैदानात यानिमित्ताने गरबा तसेच इतर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवात विविध क्षेत्रातल्या नामावंत कलाकारांकडून त्यांची कला सादर केली जाणार आहे. डीजे आणि त्यानुसार प्रकाशयोजना, नारीशक्ती सन्मान, महाआरती असे कार्यक्रम रोजच्या रोज आयोजित केले जातील. याखेरीज दोन ऑक्टोबरला रावणदहन तसेच गंगाआरती होणार आहे. उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या पुरुष, महिला, जोडी तसेच समूह, या सर्वांना रोजच्यारोज बक्षिसे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पोलीस बंदोबस्त तसेच महिला बाउन्सर्स तैनात करण्यात येणार आहेत. तरी जास्तीतजास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन नवरात्र महोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

दरम्यान, या नवरात्रौत्सवाच्या जागेचे भूमिपूजन, भारतीय जनता पार्टीच्या नमो नमो संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षा नीती सिंग, युवा नेता अनुप गायकवाड, उद्योजक नागेश गायकवाड, विजय गायकवाड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अनुप गायकवाड यांच्या मातोश्री जांभे गावाच्या पहिल्या महिला सरपंच होत. त्यांचे वडील विजय गायकवाड हेदेखील सामाजिक कार्यकर्ते आहेत.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content