Homeमुंबई स्पेशलमुंबई शहराची प्रारूप...

मुंबई शहराची प्रारूप मतदारयादी २५ जुलैला होणार प्रसिद्ध

मतदारयादी अद्ययावत तसेच अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी येत्या २५ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या २७ व २८ जुलैला तसेच ३ व ४ ऑगस्टला मुंबई शहर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व बीएलओ सर्व मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी यादव यांच्या अध्यक्षतेखाली मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत काल बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादीत नाव नसलेले नावनोंदणी करु शकतात, नावांमधील दुरुस्ती करून घेऊ शकतात तसेच नाव स्थलांतरित करुन घेऊ शकतात. ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. पुनरीक्षण मोहीम कालावधीत नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे आदी कार्यक्रम राबविले जातील, असे ते म्हणाले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, मतदारयादीमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे, मतदारयादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभागांची पुनर्रचना करणे आणि विभाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेस अंतिम रुप देणे, त्यानंतर मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्ययावतीकरण करणे, नमुना एक ते आठ तयार करणे आदी गोष्टी केल्या जाणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारयादी

 या बैठकीत मतदारनोंदणी वाढवणे आणि जनजागृती करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्यावा. तसेच मतदारनोंदणी न केलेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदारनोंदणी करावी, जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदारनोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदारयादीत ऑनलाईन नावनोंदणीसाठी किंवा तपशीलात बदल करण्यासाठी https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला भेट द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी यादव यांनी केले.

या बैठकीस स्वीपच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  श्यामसुंदर सुरवसे, संबंधित उपजिल्हाधिकारी तसेच कामगार, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content