Homeबॅक पेज'दिल्ली' आणि 'शक्ती'...

‘दिल्ली’ आणि ‘शक्ती’ पोहोचल्या मलेशियाच्या कोटा किनाबालूला!

भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल  राजेश धनखड यांच्या नेतृत्त्वाखाली दोन जहाजे, दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा किनाबालू इथे पोहोचली आहेत.

मलेशिया नौदल (रॉयल मलेशियन नेव्ही) आणि मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांनी जहाजांचे स्वागत केले. या जहाजांच्या या बंदरातील मुक्कामादरम्यान, भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, तसेच विषय सामग्रीतज्ज्ञ योग, क्रीडा स्पर्धा आणि क्रॉस-डेक या एकमेकांच्या जहाजांना भेटी यासह विविध व्यावसायिक गाठीभेटींचे आदानप्रदान करतील. याचा उद्देश दोन नौदलांमध्ये असलेले विद्यमान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा आहे.

भारतीय नौदलाची जहाजे बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशिया नौदलाच्या जहाजांसह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्येही सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या मिलान आणि एक्स समुद्रा लक्ष्मणा, या दोन उपक्रमांमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे, दोन नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या भेटीमुळे दोन सागरी शेजारी देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणखी दृढ होईल.

या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची तैनाती, भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि भारत सरकारची सागर धोरणांप्रती दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. आय एन एस दिल्ली, ही पहिली स्वदेशी रचनेची आणि बांधणीची प्रोजेक्ट-15 श्रेणीतील गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजेच पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका आहे आणि आय एन एस शक्ती हे फ्लीट सपोर्ट म्हणजे ताफ्यातील पाठबळ पुरवणारे जहाज आहे. दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा म्हणजे पूर्व ताफ्याचा भाग आहेत.

Continue reading

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...
Skip to content