Homeमुंबई स्पेशलमुंबईत गोरख चिंचेला...

मुंबईत गोरख चिंचेला येणार अच्छे दिन!

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकण्यात आली.

महापालिकेच्या एच पश्चिम विभागातून हटविण्यात आलेल्या पुरातन गोरख चिंचेच्या झाडाच्या बदल्यात पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये नव्याने गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण केले जात आहे. मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा उद्यान विभाग सतत विविध उपक्रम राबवित असते.

गोरख चिंच

उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार या महानगरातील उद्यानांमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण आणि जतन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून रविवारी आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम काढून टाकण्यात आले. याशिवाय उद्यान विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत या झाडाच्या बुंध्याशी मोठे आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकली. त्यामुळे या झाडाचे आयुष्य वाढणार आहे. तसेच पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठीदेखील याची मदत होणार आहे.

अनेक उद्यानांत होणार गोरख चिंचेच्या रोपांचे  रोपण

एच पश्चिम विभागातील पुरातन गोरख चिंचेच्या झाडाचेंदेखील रोपण पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. उद्यान विभागाने पालिकेच्या विविध उद्यानांचीही निवड केली असून त्यात गोरख चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १० ते १५ वर्षांची मोठी रोपे मागविण्यात आली आहेत. परंतु सध्या उष्मा जास्त असल्याने पुढील एक ते दोन आठवड्यात एच पश्चिम विभागातील विविध उद्यानात त्यांचे रोपण करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. 

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content