Homeन्यूज अँड व्ह्यूजनिदान मातृदिनी तरी...

निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

कालच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यामुळे आईसबंधातील जाहिरातींना सर्वच वर्तमानपत्रांत व माध्यमांमध्येंउधाण येणार हे समजू शकते. परंतु सामाजिक जाण जपणाऱ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांचाच वापर करून जाहिरात वाचकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. सामाजिक जाणीवच नव्हे तर राजकीय व सामाजिक नेत्यांना आवाज चढवून ‘देशाला हे समजले पाहिजे’, ‘देशाचा हा हक्क आहे..’, असे उठताबसता विचारणाऱ्यांनी तर जास्त ‘सजग’ राहण्याची गरज आहे.

मुख्य म्हणजे ज्या गोडेतेलाची ही जाहिरात आहे ते अतिमहागडे तेल मोठी शहरे आणि आजूबाजूच्या छोट्या शहरातच घेतले जाते. देशातील 75 ते 80 टक्के जनता ग्रामीण भागात राहत असून त्यांना हे तेल

घेणे परवडतच नाही.  इंग्रजीतील एक नामवंत लेखक म्हणतो त्याप्रमाणे “advertisement is legalized lying” तर नसेल ना इतकी शंका येऊ लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात हे मान्य आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा असाव्यात असे आता वाटू लागले आहे.

आणखी एक मोठा इंग्रजी लेखक म्हणतो की, “Good advertisement is one which sells the product without drawing attention to itself”. हे वाक्य मार्केटिंग व कॉपी लिहिणाऱ्यांना कुणी शिकवलेले नाही का? हल्ली अनेक जाहिराती पाहून असे विचारण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. आजच्या या विषयाच्याही दोन बाजू असतील. नाही असे नाही. परंतु वर्तमानपत्राचे नाव वापरून अशी जाहिरात करणे उचित नव्हे. निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

Continue reading

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...
Skip to content