Saturday, July 6, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजनिदान मातृदिनी तरी...

निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

कालच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यामुळे आईसबंधातील जाहिरातींना सर्वच वर्तमानपत्रांत व माध्यमांमध्येंउधाण येणार हे समजू शकते. परंतु सामाजिक जाण जपणाऱ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांचाच वापर करून जाहिरात वाचकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. सामाजिक जाणीवच नव्हे तर राजकीय व सामाजिक नेत्यांना आवाज चढवून ‘देशाला हे समजले पाहिजे’, ‘देशाचा हा हक्क आहे..’, असे उठताबसता विचारणाऱ्यांनी तर जास्त ‘सजग’ राहण्याची गरज आहे.

मुख्य म्हणजे ज्या गोडेतेलाची ही जाहिरात आहे ते अतिमहागडे तेल मोठी शहरे आणि आजूबाजूच्या छोट्या शहरातच घेतले जाते. देशातील 75 ते 80 टक्के जनता ग्रामीण भागात राहत असून त्यांना हे तेल

घेणे परवडतच नाही.  इंग्रजीतील एक नामवंत लेखक म्हणतो त्याप्रमाणे “advertisement is legalized lying” तर नसेल ना इतकी शंका येऊ लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात हे मान्य आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा असाव्यात असे आता वाटू लागले आहे.

आणखी एक मोठा इंग्रजी लेखक म्हणतो की, “Good advertisement is one which sells the product without drawing attention to itself”. हे वाक्य मार्केटिंग व कॉपी लिहिणाऱ्यांना कुणी शिकवलेले नाही का? हल्ली अनेक जाहिराती पाहून असे विचारण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. आजच्या या विषयाच्याही दोन बाजू असतील. नाही असे नाही. परंतु वर्तमानपत्राचे नाव वापरून अशी जाहिरात करणे उचित नव्हे. निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

Continue reading

समस्या कांदिवलीची, प्रश्नचिन्ह मुंबईच्या नियोजनावर!

मुंबई शहराचे नियोजन फसलेच आहे. पण आता दोन्ही उपनगरांचेही नियोजन केवळ फसलेच नाही तर नियोजनाचे बारा वाजलेत असेच वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत कांदिवली (पू.)नजीकच्या समता नगरमधील पाणी समस्येने जवळजवळ उग्र स्वरूप धारण केले असल्याने नियोजनाविषयीच चिंता निर्माण...

अखेर कुर्ल्यात बुलडोझर चाललाच….!!

मुंबईत चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रस्त्यावर अखेर बुलडोझर चालला. थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई महापालिकेलाही बुलडोझर चालवल्याखेरीज पर्याय राहिला नाही, असे सूत्रांनी सांगितले. चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रोडवर अनेक छोटयामोठ्या ढाब्यांनी रस्ते अडवले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकात जाण्यास...

आता न्यायमूर्तींनीच रेल्वेला प्रवाशांच्या ने-आणीचे प्रशिक्षण द्यावे!

गेले काही दिवस या ना त्या कारणाने रेल्वे खाते चर्चेतच आहे. कधी लोकल गाडीतून खाली पडून प्रवाशाचा मृत्यू, तर कधी रेल्वे गाड्यांची टक्कर, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड म्हणून टाइमटेबल कोलमडले.. आदी अनेक कारणांमुळे रेल्वे बातम्यात असतेच असते! कोणी कितीही...
error: Content is protected !!