Homeमुंबई स्पेशलकचरा उचलण्यासाठी लवकरच...

कचरा उचलण्यासाठी लवकरच ‘डी’ विभागातही ई ऑटो रिक्षा!

मुंबईत घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने ई ऑटो रिक्षांचा पर्याय अवलंबला आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘एम पूर्व’ विभागात राबवलेल्या ‘ई ऑटो रिक्षा’च्या वापरामुळे कचरा संकलन सोपे होतानाच वाहतुकीसाठी आणि पर्हीयावरणासाठीही हा पर्याय सोयीचा ठरत आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन रिक्षांचा वापर करण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. लवकरच डी विभागातदेखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे.

घरगुती कचरा संकलनावर भर देतानाच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेसाठी ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच अतिशय दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर सुरु करण्यात आला. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी काही भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागात देखील ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

‘एम पूर्व’ विभागात गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’चा वापर या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई ऑटो रिक्षांचा वापर करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार तीन ई ऑटो रिक्षांचा वापर सध्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात येत आहे. 

‘ई ऑटो रिक्षा’च्या माध्यमातून कचरा संकलन करणे हे पालिकेला जसे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी सोयीचे झाले आहे, तसे नागरिकांना देखील कचरा टाकणे हे सोयीचे ठरत आहे. नागरिकांच्या घरानजीक ‘ई ऑटोरिक्षा’मध्ये कचरा टाकण्याची सुविधा झाल्याने इतरत्र टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. गल्लीबोळातही या ऑटोरिक्षा सहजपणे जात असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येवरही हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. घरोघरी कचरा संकलनासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणानुसार झोपडपट्टीबहुल परिसरात कचरा संकलनाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट घनकचरा विभागाने ठेवले आहे. त्यानुसार आणखी तीन ‘ई ऑटो रिक्षा’ या भागासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.

फायदे ई ऑटो रिक्षाचे

‘ई व्हेईकल’मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत असल्याने कोणतेही इंधन ज्वलनाची प्रक्रिया या वाहनांसाठी होत नाही. परिणामी कार्बन उत्सर्जन होत नाही. ई वाहने चार्जिंग करण्यासाठी चौकीच्या ठिकाणी सहज वापराचा पर्याय आहे. तसेच या वाहनांपासून कोणताही आवाज निर्माण होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या मोटरसाठी देखभाल आणि दुरूस्तीचा येणारा खर्च तुलनेत कमी आहे.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content