Homeबॅक पेजस्पोर्टिंग युनियन, युरोपेम...

स्पोर्टिंग युनियन, युरोपेम यांची विजयी सुरुवात

भावना सानप (९८) हिच्या दमदार खेळीच्या बळावर यजमान स्पोर्टिंग युनियनने चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये माटुंगा जिमखान्याचा १११ धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी सुरुवात केली. यजमानांनी २० षटकांत ५ बाद १८९ धावा केल्या. आज “अ” गटातील दुसऱ्या लढतीत युरोपेमने ओरिएंटल सी. सी.चा १६ धावांनी पराभव केला. सलामीच्या रिया पवारने ५८ चेंडूंमध्ये ८१ धावा फटकावल्याने युरोपेमला ४ बाद १६८ धावा करता आल्या. उत्तरादाखल ओरिएंटलने ६ बाद १५२ धावा केल्या.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेला कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांचे सहाय्य मिळाले आहे. भावना आणि रिया यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भावनाचे शतक जरी हुकले असले तरी तिने ६५ चेंडूत ९८ धावा फटकाविताना १६ चौकार आणि १ षटकार अशी आतषबाजी केली. स्पोर्टिंग युनियनच्या अंकिता पवार (२९) हिची भावना बरोबरची तिसऱ्या विकेटसाठी केलेली ९८ धावांची भागी महत्त्वाची ठरली. त्याआधी स्पोर्टिंग युनियनची २ बाद ३ धावा अशी खराब स्थिती होती. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया-सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 

संक्षिप्त धावफलक

स्पोर्टिंग युनियन- २० षटकात ५ बाद १८९ (भावना सानप ९८), अंकिता पवार (२९), दिव्या चलवाड (२०/२), वि. वि. माटुंगा जिमखाना १४.२ षटकात सर्व बाद ७८ (अनिषा कांबळे ३७, त्वचा शेट्टी ९/२, रेणिता गोरया १३/२),  सामनावीर- भावना सानप

युरोपेम- २० षटकात ४ बाद १६८ (रिया पवार ८१) वि. वि. ओरिएंटल सी. सी. २० षटकात ६ बाद १५२ (निधी कोल्हे २५, सानिया जोशी ३४, सिद्धी कामटे २७, आर्या लोखंडे २९/४), सामनावीर- रिया पवार

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content