Homeपब्लिक फिगरशिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून अधिकाराचा गैरवापर?

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरच निशाणा साधला आहे. देसाई यांच्या अखत्यारीतील खनिकर्म महामंडळाच्या कारभारात पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

याबाबत पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक पत्र पाठवून ही बाब निदर्शनाला आणली आहे. मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस याकडे किती लक्ष देते आणि काँग्रेस हा मुद्दा किती ताणते यावर ही धुसफूस किती प्रमाणात ताणली जाईल हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना २१ मे २०२१ रोजीच पत्र पाठवले होते. परंतु या दोघांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नानांनी २३ जून २०२१ पुन्हा एक पत्र पाठवून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडून हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे कळते. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, पदाचा अनधिकृत वापर करून टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा व वॉशिंगचे काम महाजनकोसाठी पात्र ठरवून, देकारपत्र दिल्याचा आरोप पटोले यांनी या पत्रात केला आहे.

रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून या कंपनीचे कुठलेही नेटवर्क नाही. टर्नओव्हर नाही. सेक्युरिटी क्लिअरन्स नाही. कोळसा वॉशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. त्यांनी ज्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी केली आहे, ती कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे. रूखमाई कंपनीने निविदेच्या कोणत्याही अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. तरी या कंपनीला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

ही कंपनी महाजनकोला वेळेवर कोळसा पुरवू शकत नाही. त्याचा परिणाम महाजनकोच्या वीज उत्पादनावर होईल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content