Tuesday, March 11, 2025
Homeपब्लिक फिगरशिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून...

शिवसेनेच्या सुभाष देसाईंकडून अधिकाराचा गैरवापर?

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस दिवसेंदिवस वाढत असून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरच निशाणा साधला आहे. देसाई यांच्या अखत्यारीतील खनिकर्म महामंडळाच्या कारभारात पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

याबाबत पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक पत्र पाठवून ही बाब निदर्शनाला आणली आहे. मुख्यमंत्री तसेच महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस याकडे किती लक्ष देते आणि काँग्रेस हा मुद्दा किती ताणते यावर ही धुसफूस किती प्रमाणात ताणली जाईल हे स्पष्ट होईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना २१ मे २०२१ रोजीच पत्र पाठवले होते. परंतु या दोघांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नानांनी २३ जून २०२१ पुन्हा एक पत्र पाठवून याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्यांच्याकडून हे पत्र प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे कळते. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातर्फे रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला, पदाचा अनधिकृत वापर करून टेंडरचे नियम डावलून कोळसा पुरवठा व वॉशिंगचे काम महाजनकोसाठी पात्र ठरवून, देकारपत्र दिल्याचा आरोप पटोले यांनी या पत्रात केला आहे.

रूखमाई इन्फ्रास्ट्रक्चर, ही कंपनी संजय हरदवाणी चालवत असून या कंपनीचे कुठलेही नेटवर्क नाही. टर्नओव्हर नाही. सेक्युरिटी क्लिअरन्स नाही. कोळसा वॉशिंग करण्याचा काहीही अनुभव नाही. त्यांनी ज्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी केली आहे, ती कंपनी काळ्या यादीत टाकण्यात आली आहे. रूखमाई कंपनीने निविदेच्या कोणत्याही अटी व शर्तींची पूर्तता केलेली नाही. तरी या कंपनीला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

ही कंपनी महाजनकोला वेळेवर कोळसा पुरवू शकत नाही. त्याचा परिणाम महाजनकोच्या वीज उत्पादनावर होईल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content