Homeकल्चर +'दादर माटुंगा'त रंगला...

‘दादर माटुंगा’त रंगला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा केंद्राच्या गोखले सभागृहात नुकताच थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमधे विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या ह्रद्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी होत्या शशिकला कैकिणी. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत नीला भागवत, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक नीरज शिरवईकर, उत्कृष्ट प्रवासवर्णनाच्या पुस्तकाचे लेखक रवि वाळेकर (इजिप्सी या पुस्तकासाठी), उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री वनिता खरात, उत्कृष्ट संगीत नाट्य क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री डॅा. गौरी पंडित, संगीत विशारदच्या परिक्षेत दादर माटुंगा भागातून प्रथम आलेले विद्यार्थी डॅा. प्रबोध चोबे आणि अदिती करंबेळकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

नीला भागवत, इला भाटे, डॅा. चोबे यांनी आवर्जून उल्लेख केला की त्यांचे या संस्थेशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याकडून होणारा हृद्य सत्कार आणि पुरस्कार हा आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे. यावेळी ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृक्श्राव्य कार्यक्रमदेखील झाला. त्याला उपस्थितांनी दाद देत आणि प्रश्नोतराच्या माध्यमातून शंकानिरसन करून घेतले. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन विद्या धामणकर यांनी केले.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content