Homeबॅक पेज'इन्शुरन्सदेखो'ने पटकावले ग्रेट...

‘इन्शुरन्सदेखो’ने पटकावले ग्रेट प्लेस टू वर्कचे प्रमाणपत्र

इन्शुरन्सदेखो, या भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रँडला या वर्षाचे ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ख्यातनाम ग्रेट प्लेस टू वर्क® असेसमेंट अँड रिकगनिशन प्रोग्रामअंतर्गत दिले जाते आणि त्यातून इन्शुरन्सदेखोच्या विश्वास, कर्मचारीवाढ, विकास आणि नावीन्यपूर्णता यांना चालना देण्याच्या वचनबद्धतेप्रती महत्त्वाचे आहे.

या वर्षी प्रथमच इन्शुरन्सदेखोने या सर्वेक्षणात सहभाग घेतला आणि या उपक्रमातून ब्रँडच्या वाढ व सर्वोत्तमता यांच्यासाठी सर्वसमावेशक वर्कप्लेस पर्यावरणाच्या निर्मितीप्रती वचनाला अधोरेखित करण्यात आले. यातील सखोल मूल्यमापन प्रक्रियेत विविध निकष जसे कार्यस्थळाची संस्कृती, समावेशकता, निष्पक्ष कार्यपद्धती, वाढीच्या क्षमता आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केला गेला. 

इन्शुरन्सदेखोच्या संस्कृतीला कार्यस्थळाचा अभिमान, विश्वासार्हता आणि आदर तसेच न्याय्यपूर्णता यांच्याप्रती वचनबद्धता या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले आहेत. आपल्या कर्मचारी प्रथम धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने सातत्याने वैविध्यपूर्ण वाढ, सहभागात्मक निर्णय प्रक्रिया आणि सबलीकरण या गोष्टींवर भर देऊन विश्वास व न्याय्यता या पायांवर ती उभी आहे.

इन्शुरन्सदेखोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले की, इन्शुरन्सदेखोचे या सर्वेक्षणातील सहभागाचे पहिलेच वर्ष असताना हे ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र आमच्या एका आगळ्यावेगळ्या कार्यस्थळाच्या उभारणीप्रति वचनबद्धतेचे प्रतीक आहे. इथे कर्मचारी प्रचंड मेहनत करून आमच्या एकत्रित यशात योगदान देतात. मूल्ये, न्याय्यता आणि आमच्या टीमचे सबलीकरण यांच्यावरील सातत्यपूर्ण लक्ष्याचे हे प्रतीक आहे.

इन्शुरन्सदेखोच्या सीएचआरओ दिव्या मोहन म्हणाल्या की, इन्शुरन्सदेखोमध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना व्यवसायाच्या केंद्रस्थानी ठेवतो आणि जीपीडब्ल्यूआयने प्रमाणित होणे ही गोष्ट आम्ही दररोज करत असलेल्या गोष्टींमधील आमच्या निष्ठा दर्शवते. आम्हाला प्रत्येक व्यक्तीचे मूल्य जपणाऱ्या, वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि सर्वांसाठी न्याय्य व काळजीवाहक वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वसमावेशक संस्कृतीचा अभिमान आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content