Homeबॅक पेजभारतासाठी हरित संक्रमणाचा...

भारतासाठी हरित संक्रमणाचा मार्ग शोधण्याचा मुंबईत प्रयत्न!

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे मुंबईत काल ‘भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग” या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद 2024, आयोजित करण्यात आली होती. तंत्रज्ञान क्षमता व वित्तीय संसाधनांना चालना देण्यात संस्थात्मक गुंतवणूकदार, हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि खासगी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका यावर ही परिषद केंद्रित होती. सरकारी प्रयत्नांना बळकटी, नागरी समाज आणि समुदायांना सहभागी करून घेणे आणि अनुकूलन तंत्रज्ञान व नवोन्मेषी हवामान सेवा विकसित करणे, हे यामागचे उद्दिष्ट होते. ‘ग्रीन क्लायमेट फंड रेडीनेस प्रोग्राम’ अंतर्गत सक्रिय भागीदार यूएनडीपी भारत यांच्यासह आणि ज्ञान भागीदार अवाना कॅपिटल यांच्या सहाय्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

पर्यावरण सचिव लीना नंदन, जी-20 शेर्पा अमिताभ कांत, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणाचे अध्यक्ष, के राजारामन, अमेरिकेचे महावाणिज्य दूत माईक हॅन्की आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच गोदरेज अग्रोव्हेटचे अध्यक्ष नादीर गोदरेज या उदघाटन सत्राला उपस्थित होते.

हवामान बदलामुळे होणाऱ्या तीव्र घटनांचा जागतिक परिणाम, एम. ओ. ई. एफ. सी. सी. च्या सचिव लीना नंदन यांनी अधोरेखित केला आणि त्वरित कृती, नियोजन आणि आर्थिक एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी हरित पत कार्यक्रमासह मंत्रालयाच्या कृतींची माहिती दिली. पर्यावरणस्नेही जीवनशैलीची (एल. आय. एफ. ई.) आठवण करून देताना त्यांनी नमूद केले की, ग्राहकांच्या माहितीपूर्ण निवडीसाठी इकोमार्क लेबलिंगची संकल्पना नव्याने शोधण्यात आली आहे. विमा आणि जोखीम कमी करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, हवामान स्टार्टअप्सना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना उद्योग आणि व्यवसाय प्रारुपापर्यंत वाढवणे यावर नंदन यांनी भर दिला. हवामान कृतीसाठी बायोमास वापर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या कृती लक्षणीय आहेत यावर भर देण्यात आला.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content