Homeबॅक पेजभारतासाठी हरित संक्रमणाचा...

भारतासाठी हरित संक्रमणाचा मार्ग शोधण्याचा मुंबईत प्रयत्न!

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे मुंबईत काल ‘भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग” या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद 2024, आयोजित करण्यात आली होती. तंत्रज्ञान क्षमता व वित्तीय संसाधनांना चालना देण्यात संस्थात्मक गुंतवणूकदार, हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि खासगी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका यावर ही परिषद केंद्रित होती. सरकारी प्रयत्नांना बळकटी, नागरी समाज आणि समुदायांना सहभागी करून घेणे आणि अनुकूलन तंत्रज्ञान व नवोन्मेषी हवामान सेवा विकसित करणे, हे यामागचे उद्दिष्ट होते. ‘ग्रीन क्लायमेट फंड रेडीनेस प्रोग्राम’ अंतर्गत सक्रिय भागीदार यूएनडीपी भारत यांच्यासह आणि ज्ञान भागीदार अवाना कॅपिटल यांच्या सहाय्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

पर्यावरण सचिव लीना नंदन, जी-20 शेर्पा अमिताभ कांत, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणाचे अध्यक्ष, के राजारामन, अमेरिकेचे महावाणिज्य दूत माईक हॅन्की आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच गोदरेज अग्रोव्हेटचे अध्यक्ष नादीर गोदरेज या उदघाटन सत्राला उपस्थित होते.

हवामान बदलामुळे होणाऱ्या तीव्र घटनांचा जागतिक परिणाम, एम. ओ. ई. एफ. सी. सी. च्या सचिव लीना नंदन यांनी अधोरेखित केला आणि त्वरित कृती, नियोजन आणि आर्थिक एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी हरित पत कार्यक्रमासह मंत्रालयाच्या कृतींची माहिती दिली. पर्यावरणस्नेही जीवनशैलीची (एल. आय. एफ. ई.) आठवण करून देताना त्यांनी नमूद केले की, ग्राहकांच्या माहितीपूर्ण निवडीसाठी इकोमार्क लेबलिंगची संकल्पना नव्याने शोधण्यात आली आहे. विमा आणि जोखीम कमी करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, हवामान स्टार्टअप्सना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना उद्योग आणि व्यवसाय प्रारुपापर्यंत वाढवणे यावर नंदन यांनी भर दिला. हवामान कृतीसाठी बायोमास वापर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या कृती लक्षणीय आहेत यावर भर देण्यात आला.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content