Homeटॉप स्टोरीयोगाचा झाला क्रीडा...

योगाचा झाला क्रीडा प्रकारांमध्ये समावेश!

भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. आ. तांबे यांनी या मागणीसाठी विधिमंडळाच्या गेल्या तीन अधिवेशनांमध्ये आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा केला होता. आता सरकारने शासननिर्णय जारी करत योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे यामुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.

गेल्या तीन अधिवेशनापासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. हिवाळी अधिवेशनात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी, ३१ डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासित केले होते. हा निर्णय झाल्यानंतर आ. सत्यजीत तांबे यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.

योगा

राज्यातील खेळाडू, संघटक व कार्यकर्ते, मार्गदर्शक यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. परंतु, यात कुठेही योग क्रीडा प्रकाराचा समावेश नव्हता. भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

हा तर योगविद्येचा सन्मान!

बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत योगविद्येचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण इतर खेळांच्या तुलनेत योगविद्येकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कारपात्र क्रीडाप्रकारांच्या यादीत योगाचा समावेश केला, तर आणखी लोक योगाकडे वळतील, अशी ही मागणी करताना माझी धारणा होती. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचा शासन निर्णय ३१ डिसेंबरच्या आत जाहीर केला, याचा मला आनंद आहे. हा योगविद्येचा सन्मान आहे, असं मी मानतो, अशी प्रतिक्रिया आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content