Homeमुंबई स्पेशलघर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध...

घर जाळणाऱ्या आंदोलकांविरूद्ध ३०७ कलमाखाली गुन्हे!

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या लोकांनी घरे जाळली त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली (कलम ३०७) गुन्हे दाखल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

बीड जिल्ह्यात घरात माणसं असताना बाहेरून घर पेटवून देण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचे सर्व व्हिडिओ मिळाले असून 50 ते 55 जणांना ओळखण्यात आले आहे. या सर्वांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत घरे जाळणे किंवा मालमत्ता जाळणे असे प्रकार पोलीस खपवून घेणार नाहीत. जिथे शांततेत आंदोलन चालू आहे तेथे पोलीस त्यांना विरोध करणार नाहीत. मात्र जिथे हिंसाचार होईल तेथे पोलीस कडक कारवाई करतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

काही लोक या आंदोलनाचा फायदा घेत हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये काही हॉटेल, दवाखाने, प्रतिष्ठान पेटवण्याचा प्रयत्न झाला. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि याची गंभीर दखल गृह विभागाने तसेच पोलिसांनी घेतली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी आहेत. या कार्यकर्त्यांच्या सहभागाची खात्री पटल्यावर त्यांची नावे जाहीर केली जातील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content