Homeटॉप स्टोरीअखेर संजय राठोड...

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर!

पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात गाजत राहिलेले वनमंत्री यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आज अखेर मंजूर झाला. रविवारपासून दाबून ठेवलेला राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीच्या दबावानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. तेथे तो लागलीच मंजूर करण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते, असे राजभवनाकडून सांगण्यात आले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. राठोड यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी केली जात होती. भाजपा नेत्यांनी या प्रकरणातील अनेक पुरावे

जनतेसमोर उघड केले होते. तरीही मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठिशी घालत होते. या काळात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही राठोड यांनी केला. अखेर तब्बल २० दिवसांनंतर रविवारी, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. या राजीनाम्याचे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला असता तो फ्रेम करण्यासाठी ठेवलेला नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा आपल्याकडेच ठेवला होता.

राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविलाच गेला नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यातच कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. तशी एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांत फिरू लागली. त्याबरोबर जारकीहोळी यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ठाकरे यांच्यांवरील दबाव वाढला आणि त्यांना राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावा लागला. आज दुपारी त्यांनी तो राजभवनाकडे पाठविला आणि राज्यपालांनी तो लगेचच मंजूर केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content