Homeकल्चर +'इंद्रायणी'चे ३०० भाग...

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!


कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बऱ्याच घटना बघायला मिळाल्या आहेत. इंदूचा संघर्षमय प्रवास.. त्यात आंनदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं. या मालिकेने ३०० भागांचा पल्ला गाठला आहे.

दुसरीकडे, आपल्याला विठूच्या वाडीत इंदू आणि फँटया गॅंग बरीच धम्माल मस्ती करतानादेखील दिसतात. मालिकेमध्ये इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरु झाला आणि इंदू आनंदीच्या विळख्यात अजूनच अडकत गेली. इंदूचा आजवर दु:स्वास करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले. इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांनादेखील महाराजांना कळले. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत हे खूपच चुकीचं आहे हेदेखील समजविण्याचा प्रयत्न व्यंकू महाराज करताना दिसून आले. आता आंनदीबाईंचा खरा चेहरा व्यंकू महाराज इंदूच्या समोर आणू शकतील? इंदूचा यावर विश्वास बसेल? हे बघणे रंजक असणार आहे.

व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला की, इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत याचा खूप आनंद आहे. याआधी जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये मी चोळप्पाचे पात्र साकारले होते आणि आता मला व्यंकू महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये काम करत असताना मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. चोळप्पाची व्यक्तिरेखा साकारणे आणि आता व्यंकू महाराजांची भूमिका करणे या दोन्हींमध्ये खूप फरक होता. कारण चोळप्पाच्या व्यक्तिरेखेला एक ऐतिहासिक बाज, संदर्भ होता. पण, व्यंकू महाराजांच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. महत्त्वाचे म्हणजे वारकरी कीर्तन वा अभंग किंवा एकंदरीतच वारकरी सांप्रदाय याच्याशी खूप जवळून संबंध ही भूमिका साकारताना आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानग्या इंदूसोबत काम करताना आणि एका वेगळ्याच भाषेच्या लहेजामध्ये काम करताना खरंच खूप मजा आली. मालिकेचे ३०० भाग कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही. मालिकेतल्या सगळ्या लहान मुलांसोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंदाचा आणि खूप काही शिकवून जाणारा भाग होता. संपूर्ण टीमने केलेल्या उत्तम सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडतेय.. त्याची पावती मिळतेय हीदेखील माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content