Homeहेल्थ इज वेल्थ'केईएम'मध्ये काल गोळा...

‘केईएम’मध्ये काल गोळा झाले १८० बाटल्या रक्त

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११व्या जयंतीनिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था ही मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची संस्था आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गुणगौरव सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांचा समावेश असतो. दिनांक १ जुलै

रोजी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालिका सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष धर्मा राठोड, उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश राठोड, खजिनदार विजय जाधव, विभागीय कामगार व कल्याण अधिकारी दिलीप राठोड, अविनाश राठोड, विशाल राठोड, मिनाक्षी राठोड, सरला राठोड, देविदास चव्हाण, विशाल जाधव, वसंत राठोड, डी. डी. नाईक, अमोल राठोड, निरंजन मुढे, गोकुळ राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content