Homeब्लॅक अँड व्हाईटगेल्या वर्षी 'भारत...

गेल्या वर्षी ‘भारत गौरव’ ट्रेनच्या झाल्या 172 फेऱ्या!

भारतीय रेल्वेने ‘भारत गौरव’ पर्यटक गाड्यां अंतर्गत संकल्पना-आधारित मार्गांवर पर्यटक गाड्या चालवण्याची संकल्पना मांडली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे प्रदर्शित करणे हा या संकल्पना आधारित पर्यटक मार्ग गाड्यांचा उद्देश आहे. गेल्या वर्षी, 2023मध्ये, 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या देशभरातील विविध पर्यटनस्थळांवरून 96,491 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या भारत गौरव गाड्यांच्या एकूण 172 फेऱ्या चालवण्यात आल्या. या गाड्यांनी श्री राम-जानकी यात्रा, अयोध्या ते जनकपूर, श्री जगन्नाथ यात्रा, “गरवी गुजरात” सहल, आंबेडकर सहल, ईशान्य सहल यासारख्या प्रमुख पर्यटनक्षेत्रांचा प्रवास केला आहे.

या गाड्यांमधील प्रवास खर्च सर्वसमावेशक सहल पॅकेजेसच्या स्वरूपात दिला जातो. यात आरामदायी रेल्वे प्रवास आणि संबंधित सेवांसह ऑफ-बोर्ड प्रवास आणि बसमधून स्थलदर्शन, हॉटेलमध्ये राहणे, सहल मार्गदर्शक, जेवण, प्रवास विमा इत्यादी सेवा पुरवल्या जातात.

भारत गौरव रेल्वेगाडी योजनेंतर्गत उत्तम दर्जाच्या डब्यांसह रेल्वे आधारित पर्यटनाच्या तरतुदीद्वारे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केन्द्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगानेही हे पाऊल उचलले आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या- https://www.irctctourism.com/bharatgaurav.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content