Details
“वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी”
01-Jul-2019
”
राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.
मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”
“राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.
मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”