HomeArchiveमुलुंड-गोरेगाव लिंक रोड...

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

Details
मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content