HomeArchiveमुलुंड-गोरेगाव लिंक रोड...

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

Details
मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content