HomeArchiveमुलुंड-गोरेगाव लिंक रोड...

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

Details
मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content