HomeArchiveमुंबई, कोकण किनारपट्टीवरील...

मुंबई, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा

Details
“मुंबई, कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डिझेलवरील कर परताव्याच्या वाटपास सुरूवात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवरील विक्रीकर परताव्याची रक्कम शासनाने मंजूर केली आहेत. यामुळे समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारामुळे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

कोकण तसेच मुंबई किनारपट्टीवर मासेमारी करण्यासाठी हायस्पीड नौकांचा वापर केला जातो. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलवर त्यांना कर परतावा मिळणे आवश्यक होते. परंतु अनेक दिवसांपासून ही रक्कम प्रलंबित होती. यासंदर्भात मच्छिमारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मत्स्यविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील शासनाचा आदेश सोमवारी, ८ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हानिहाय वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सिंधुदूर्गमध्ये तीन कोटी, पालघरमध्ये तीन कोटी, ठाण्यात दोन कोटी, रत्नागिरीत तीन कोटी, रायगडमध्ये तीन कोटी, मुंबई उपनगरात तीन कोटी, मुंबई शहर भागात तीन कोटी, असे एकूण २० कोटी रूपये वितरित केले जात आहेत.

एकूण १४२ कोटी रूपयांचे वितरण केले जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा २० कोटींचा आहे. उर्वरित १२२ कोटी रूपयांचे यापुढे दरमहा वाटप केले जाणार आहे. जून २०१९ पर्यंत सर्व वाटप पूर्ण होईल. ही रक्कम वितरित करण्यासाठी संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांना वितरण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित मच्छिमारांना वितरित केली जाणार आहे. मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे देसाई यांनी सांगितले.”
 
“डिझेलवरील कर परताव्याच्या वाटपास सुरूवात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवरील विक्रीकर परताव्याची रक्कम शासनाने मंजूर केली आहेत. यामुळे समुद्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारामुळे ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

कोकण तसेच मुंबई किनारपट्टीवर मासेमारी करण्यासाठी हायस्पीड नौकांचा वापर केला जातो. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलवर त्यांना कर परतावा मिळणे आवश्यक होते. परंतु अनेक दिवसांपासून ही रक्कम प्रलंबित होती. यासंदर्भात मच्छिमारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मत्स्यविकास विभागाने हा निधी मंजूर केला आहे. त्यासंदर्भातील शासनाचा आदेश सोमवारी, ८ एप्रिल रोजी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेला निधी जिल्हानिहाय वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सिंधुदूर्गमध्ये तीन कोटी, पालघरमध्ये तीन कोटी, ठाण्यात दोन कोटी, रत्नागिरीत तीन कोटी, रायगडमध्ये तीन कोटी, मुंबई उपनगरात तीन कोटी, मुंबई शहर भागात तीन कोटी, असे एकूण २० कोटी रूपये वितरित केले जात आहेत.

एकूण १४२ कोटी रूपयांचे वितरण केले जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा २० कोटींचा आहे. उर्वरित १२२ कोटी रूपयांचे यापुढे दरमहा वाटप केले जाणार आहे. जून २०१९ पर्यंत सर्व वाटप पूर्ण होईल. ही रक्कम वितरित करण्यासाठी संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) यांना वितरण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित मच्छिमारांना वितरित केली जाणार आहे. मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे देसाई यांनी सांगितले.”

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content