HomeArchiveमुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी...

मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

Details
मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 
“उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

 

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content