HomeArchiveमुंबईकरांना सुरक्षित, सुखद...

मुंबईकरांना सुरक्षित, सुखद प्रवासाचा आनंद मिळणार – मनोज कोटक

Details
“मुंबईकरांना सुरक्षित, सुखद प्रवासाचा आनंद मिळणार – मनोज कोटक”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उपनगरीय लोकल सेवा अधिक सक्षम करून मुंबईकर रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुखद आणि आरामदायी प्रवासाचा आनंद देणे, यालाच आपल्या सरकारचे सर्वाधिक प्राधान्य असून येत्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेचा चेहरामोहराच बदलेल, असा विश्वास ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

 

गेल्या आठवड्यात कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान प्रवाशांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुंबई उपनगरीय लोकलसाठी एकूण ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापैकी सुरूवातीच्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प म्हणजेच एमयूटीपी- ३अ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली. गेल्या पन्नास वर्षांतील मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. या निधीतून रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांची दर्जोन्नती करण्यात येणार असून पादचारी पूल सुशोभिकरण, सर्व उपनगरीय रेल्वेस्थानकांवर सरकते जिने व लिफ्ट तसेच मुंबईच्या ३२ स्थानकांमध्ये एकात्मिक सुरक्षा प्रणाली सुरू करण्यासाठी वीस कोटी रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले

बऱ्याच कालावधीनंतर या देशाला एक पियुष गोयल यांच्या रूपाने एक मुंबईकर रेल्वेमंत्री लाभल्यामुळे काँग्रेसच्या काळात दुर्लक्षित असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचा जास्तीतजास्त विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून मीसुद्धा प्रचारादरम्यान माझ्या मतदारसंघात असलेल्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी देत आहे. या भेटींदरम्यान रेल्वे प्रवाशांशी होत असलेल्या चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले आहेत. रेल्वे प्रवाशांकडून आलेल्या या सूचनांचा मी पुढील काळात पाठपुरावा करणार असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी हा माझा प्रयत्न असेल, असेही कोटक यांनी सांगितले.

 
होर्डिंग्जचे विद्रुपीकरण

दरम्यान, भाजपाविरोधी काही तत्त्वांनी शिवाजी नगर, गोवंडी परिसरात उभ्या असलेल्या भाजपाच्या एलईडी रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तसेच निशाणीचे विद्रुपीकरण केले. कोटक यांच्या प्रचारासाठी हा रथ वापरला जात होता. भाजपाने याबद्दल शिवाजीनगर पोलीसठाण्यात तक्रार केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई उपनगरीय लोकल सेवा अधिक सक्षम करून मुंबईकर रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुखद आणि आरामदायी प्रवासाचा आनंद देणे, यालाच आपल्या सरकारचे सर्वाधिक प्राधान्य असून येत्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेचा चेहरामोहराच बदलेल, असा विश्वास ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

 

गेल्या आठवड्यात कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान प्रवाशांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मुंबई उपनगरीय लोकलसाठी एकूण ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यापैकी सुरूवातीच्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प म्हणजेच एमयूटीपी- ३अ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली. गेल्या पन्नास वर्षांतील मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. या निधीतून रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांची दर्जोन्नती करण्यात येणार असून पादचारी पूल सुशोभिकरण, सर्व उपनगरीय रेल्वेस्थानकांवर सरकते जिने व लिफ्ट तसेच मुंबईच्या ३२ स्थानकांमध्ये एकात्मिक सुरक्षा प्रणाली सुरू करण्यासाठी वीस कोटी रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले

बऱ्याच कालावधीनंतर या देशाला एक पियुष गोयल यांच्या रूपाने एक मुंबईकर रेल्वेमंत्री लाभल्यामुळे काँग्रेसच्या काळात दुर्लक्षित असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचा जास्तीतजास्त विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून मीसुद्धा प्रचारादरम्यान माझ्या मतदारसंघात असलेल्या विविध उपनगरीय रेल्वेस्थानकांना भेटी देत आहे. या भेटींदरम्यान रेल्वे प्रवाशांशी होत असलेल्या चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले आहेत. रेल्वे प्रवाशांकडून आलेल्या या सूचनांचा मी पुढील काळात पाठपुरावा करणार असून प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी हा माझा प्रयत्न असेल, असेही कोटक यांनी सांगितले.

 
होर्डिंग्जचे विद्रुपीकरण

दरम्यान, भाजपाविरोधी काही तत्त्वांनी शिवाजी नगर, गोवंडी परिसरात उभ्या असलेल्या भाजपाच्या एलईडी रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तसेच निशाणीचे विद्रुपीकरण केले. कोटक यांच्या प्रचारासाठी हा रथ वापरला जात होता. भाजपाने याबद्दल शिवाजीनगर पोलीसठाण्यात तक्रार केली आहे.”
 
 

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content