HomeArchiveमागठाणेत विजय संकल्प...

मागठाणेत विजय संकल्प मेळावा संपन्न!

Details
मागठाणेत विजय संकल्प मेळावा संपन्न!

    30-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतल्या मागठाणे विधानसभेतील सौराष्ट्र पटेल हॉल, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथे शिवसेना विभाग क्रमांक १च्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतेच केले. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, विभागसंघटक सुजाता शिंगाडे व मागठाणे विधानसभेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना सुभाष देसाई यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली व आजही मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना किती महत्त्वाची आहे हे सांगितले. मागठाणेत सर्व बूथप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी यांची उपस्थिती पाहून निवडणुकीची जय्यत तयारी मागठाणेची झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणारच, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
 
 
आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणातून मागठाणेमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच सादर केली. मागाठाणेतील २३२ रूग्णांवर ५ कोटी २८ लाख रूपयांचे मोफत इलाज केले गेले. ४६८ रूग्णांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली. ५० रूपयात डायलिसीस करणारे सेंटर दहिसरमध्ये उभे केले. २३८० ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथाचे मोफत दर्शन घडवून आणल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
 
 
सदर मेळाव्यात शिवसेनेचे पुरूष व महिला सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी व हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून संवाद साधला व शिवसेनेच्या विजयाचे मालवणी भाषेतून गाऱ्हाणे घातले. त्याला होय महाराजा म्हणत उपस्थित शिवसैनिकांनीदेखील प्रतिसाद दिला.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“मुंबईतल्या मागठाणे विधानसभेतील सौराष्ट्र पटेल हॉल, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथे शिवसेना विभाग क्रमांक १च्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतेच केले. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, विभागसंघटक सुजाता शिंगाडे व मागठाणे विधानसभेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.”
 
 
“याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना सुभाष देसाई यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली व आजही मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना किती महत्त्वाची आहे हे सांगितले. मागठाणेत सर्व बूथप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी यांची उपस्थिती पाहून निवडणुकीची जय्यत तयारी मागठाणेची झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणारच, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.”
 
 
आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणातून मागठाणेमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच सादर केली. मागाठाणेतील २३२ रूग्णांवर ५ कोटी २८ लाख रूपयांचे मोफत इलाज केले गेले. ४६८ रूग्णांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली. ५० रूपयात डायलिसीस करणारे सेंटर दहिसरमध्ये उभे केले. २३८० ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथाचे मोफत दर्शन घडवून आणल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
 
 
“सदर मेळाव्यात शिवसेनेचे पुरूष व महिला सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी व हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून संवाद साधला व शिवसेनेच्या विजयाचे मालवणी भाषेतून गाऱ्हाणे घातले. त्याला होय महाराजा म्हणत उपस्थित शिवसैनिकांनीदेखील प्रतिसाद दिला.”

मुंबईमागठाणे विधानसभाविजय संकल्प मेळावासुभाष देसाईप्रकाश सुर्वेअभिनेते दिगंबर नाईककाशी विश्वनाथ

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content